राजकारण

सुशांतसिंह प्रकरणही सीबीआयकडे होतं, त्याचं काय झालं? : भाई जगताप

मुंबई: सुशांतसिंह राजपूत प्रकरणही सीबीआयकडे गेलेलं आहे. त्याचं काय झालं? असा सवाल काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची सीबीआय चौकशी करणार असून चौकशी अहवाल आल्यावरच त्यावर भाष्य करता येईल, असंही जगताप यांनी म्हटलं आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाई जगताप यांनी हा सवाल केला. सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे दिलं होतं. आज दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. या प्रकरणात कुणालाही अटक झालेली नाही. एवढेच नव्हे तर या प्रकरणाचा अहवालही अद्याप आलेला नाही. या चौकशीचं नेमकं काय झालं? असा सवाल भाई जगताप यांनी केला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपाची सीबीआय चौकशी करणार आहे. 15 दिवसात ही चौकशी होणार आहे. अहवाल आल्यानंतर जी कारवाई व्हायची ती होईलच. तोपर्यंत त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही, असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी भाजपवरही टीका केली. भाजपने काँग्रेसची इमेज कशी झाली आहे याची काळजी करू नये. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची जी इमेज झाली आहे, ते आधी पाहावं. काँग्रेस ही गल्ली बोळातील नाही. 137 वर्षाचा काँग्रेसचा इतिहास आहे. ही एक चळवळ आहे. काँग्रेसची काळजी भाजप नाही तर जनताच करेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button