राजकारण

खरं किती टोचतं हे भाषेवरून स्पष्ट झालं!

भाई जगताप यांची अमृता फडणवीस यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया

मुंबई : मुंबई पोलिसांची खाती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नीच्या बँकेत कशाचा आधारावर वर्ग केली होती. याच उत्तर द्यावं, असा सावाल भाई जगताप यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांचा एकेरी उल्लेख केला आहे. अशातच आता खरं किती टोचतं हे अमृता फडणवीस यांच्या भाषेवरून समोर आलं, अशी प्रतिक्रिया भाई जगताप यांनी दिली आहे.

अमृता फडणवीस यांच्या भाषेवरून एक लक्षात आलं की, खरं किती टोचतं. मी केवळ सवाल केला होता की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची बायको काम करत असलेल्या बँकेत पोलिसांची खाती कशाच्या आधारावर वर्ग करण्यात आली? ते जनतेसमोर यावं. याला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी जी भाषा वापरली त्यावरून सत्य किती टोचत हे समोर आलं आहे, असं म्हणत भाई जगताप यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी बोलताना सांगितलं की, “माझ्या माहितीनुसार 2005 साली आघाडी सरकारने एक निर्णय घेतला होता की, पोलिसांची खाती विविध बँकेत वर्ग करण्यात यावीत. त्यावेळी केवळ निर्णय झाला होता. तो अंमलात आणण्यात आला नव्हता. तो अंमलात आला 2017 साली. विशेष बाब म्हणजे ज्या बँकेत देवेंद्र फडणवीस यांची बायको काम करते त्याच बँकेत कसे काय खाती वर्ग करण्यात आली? असा सवाल माझा आजही कायम आहे. त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट केले. पण ते गौप्यस्फोट काय आहेत हे तरी त्यांनी सांगावं. करावं त्यांनी उघड. मुळात देवेंद्र फडणवीस यांना हा डेटा कुठून मिळाला हा गंभीर प्रश्न आहे. घटनेने ठरवून दिलेले कायदे सर्वांसाठी सारखे आहेत. माझा सवाल केंद्र सरकारला आहे की, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना काही विशेष अधिकार दिले आहेत का? याचा खुलासा त्यांनी करावा.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button