‘सारथी’वर खासगी संचालकांच्या नियुक्त्या करून आंदोलन निष्प्रभ करण्याचा डाव : आबासाहेब पाटील
नवी मुंबई: सारथी संस्थेवरील खासगी संचालकांच्या नियुक्त्या हा मराठा आंदोलन निष्प्रभ करण्याचा डाव असल्याची टीका मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील यांनी केली. राज्य सरकारने प्रथम सारथी संस्थेत झालेल्या गैरव्यवहाराचा चौकशी अहवाल जाहीर करावा, अशी मागणीही आबासाहेब पाटील यांनी केली.
ते नवी मुंबईत शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी सारथी संस्थेवरील संचालक नियुक्तीवरुन आक्रमक भूमिका घेतली. सारथीवर संचालक नेमण्याचा विषय असेल तर राज्यातील सर्व संघटनाना विचारत घ्यावे. चुकीचा निर्णय घेत असाल तर तो खपवून घेणार नाही. समाजाची असून यावर कोणी डोळा ठेवून आंदोलन करत असतील तर ती मान्य नाहीत, असे आबासाहेब पाटील यांनी म्हटले.
समाजाचा निर्णय आहे तो सर्वांसमोर झाला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांची मते घेऊन घ्यावीत. मगच निर्णय घ्यावा चुकीचा निर्णय घेत असाल तर तो खपवून घेणार नाही, असेही आबासाहेब पाटील यांनी सांगितले.