Top Newsराजकारण

काही मंडळींकडून आघाडीत मिठाचा खडा टाकण्याचे काम; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

ठाणे : ठाणे जिल्ह्यात तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना हे ९९ टक्के आघाडीत लढतील असा विश्वास राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. परंतु दोनही पक्षातील काही विघ्न संतुष्ट मंडळी या दुधात मीठाचा खडा टाकण्याचे काम करीत असल्याचेहा गोप्यस्फोटही त्यांनी केला. परंतु आपला वैचारीक शत्रु हा भाजप असल्याने त्यांना पराभूत करण्यासाठी आपल्याला दोन पावले मागे आले तरी चालणार आहे. परंतु आघाडी ही करावीच लागणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी ठाण्यात राष्ट्रवादीच्या वतीने राष्ट्रवादी परिवार संवाद या कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे सुतोवाच केले. आगामी निवडणुकीसाठी आपल्याकडे आता फक्त ९० दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यानुसार आता आळस झटकून प्रत्येकाने कामाला लागले पाहिजे असे त्यांनी सांगितले. शरद पवार हे किमयागार आहेत. जे काम कोणाकडूनही होणार नाही; ते काम तेच करु शकतात, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. माणसामधील क्षमता आणि गुणवत्ता पडताळण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच माझ्यातील क्षमता ओळखून समाजातील शेवटच्या घटकाला हक्काचे घर मिळवून देण्यासाठीच माझ्याकडे गृहनिर्माण हे खाते शरद पवार यांनी दिले आहे, असे आव्हाड म्हणाले. गोरगरीब जनतेच्या घरांसंदर्भात डॉ. आव्हाड यांनी, मध्यमवर्गीयांच्या घरांचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी माझी आहे. मध्यमवर्गीयांना स्वस्तात घरे देण्याचे काम मी हाती घेतले आहे. समाजातील शेवटच्या माणसाला घर देण्याची जबाबदारी माझी आहे. ती आपण पूर्ण करणारच, असे सांगितले.

प्रत्येकाच्या घराघरात पोहोचले पाहिजे, बुथ लेव्हलची रचना, वॉर्ड रचना आदींची कामे वेगाने करुन भाजपने नोटबंदी, जीएसटी आणि इतर कोण कोणत्या चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याची माहिती ही प्रत्येकाला देण्याचे काम कार्यकत्र्याने करायला हवे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिली. राज्यात देखील महाविकास आघाडीचे काम हे योग्य पध्दतीने सुरु असून शरद पवार यांच्या नंतर राज्यासाठी काम करणारा कोण नेता असेल तर ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे असल्याचेही सांगत मुख्यमंत्र्यांचे त्यांनी पुन्हा कौतुक केले.

एका कुटुंब प्रमुखाप्रमाणो ते काम करीत आहेत. येत्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आघाडी होईल असे मला नक्की वाटत आहे, कदाचित एकनाथ शिंदे यांना देखील तसेच वाटत आहे. त्यामुळे आमच्यात काही गोष्टींवरुन वाद जरी होत असले तरी ते काही वेळेस पाण्यावरुन, कार्यक्रमाला बोलावले नाही म्हणून होत आहेत. मात्र ते तेवढय़ापुर्ती असल्याने आघाडी ही निश्चित होईल असे सुतोवाच त्यांनी पुन्हा केले.

संजय राऊतांकडून माणसुकीचे दर्शन

शरद पवार यांच्यासाठी संजय राऊतांनी खुर्ची उचलून दिली. यावरुन भाजपची मंडळी टिका करीत आहेत. परंतु एका वडलीधा:या माणसाला राऊतांनी केलेली मदत म्हणजेच त्यांनी यातून एकप्रकारे यातून माणसुकीचे दर्शन घडविले आहे. मात्र भाजपमध्ये तर लालकृष्ण अडवाणी यांना उभे राहण्यासाठी देखील जागा दिली जात नाही, ही त्यांच्या संस्कृती असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

सोशल मिडीयावर सक्रीय राहून निवडणुक जिंकता येत नाही

यावेळी उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्याचे देखील यावेळी आव्हाड यांनी कान टोचले. फेसबुक, ट्विटरवर सक्रीय राहून निवडणुक जिंकता येत नसल्याचे सांगत, मतदार नोंदणी, घराघरात जाऊन पक्षाचा अंजेडा रुजवा, आपण नगरसेवक नाही, म्हणून वॉर्डातील कामे करणो टाळू नका, लोकांची कामे करा, आता निवडणुकीत पडलो म्हणून पुढील पाच वर्ष कामच करायचे नाही, असे चालणार नसल्याचा सल्लाही त्यांनी दिला.

ओबीसी आरक्षण कोण रोखतंय ?

जे कोण कोर्टात जात आहेत, ते सर्वाना माहित आहे. ओबीसी आरक्षणासाठी आम्ही लढा सुरु ठेवला आहे आणि तो सुरच ठेवणार आहे. शिक्षणात, नोकरीत, निवडणुकीत आरक्षण मिळत असेल, तर का काढत आहेत, समता आणि समानता ही शवेटी राजकीय असली पाहिजे ही भावना निती मंडळाने व्यक्त केली आहे. त्याची अंमलबजावणी शरद पवार यांनी राज्यात केली. मात्र येथील सर्वसामान्य शोषीत माणसाला राजकीय अधिकार मिळाला पाहिजे ही आमची भावना आहे.

आनंद परांजपे यांचे कौतुक

आनंद परांजपे यांना बूथ रचनेबद्दल काही सूचना देण्याची गरज नाही. ते त्यामध्ये माहीर आहेत. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी कामाला सुरुवातही केली आहे. २४ तास पक्षासाठी काम करणारे ते जिल्हाध्यक्ष आहेत. शरद पवारसाहेबांनीच त्यांची या पदावर नियुक्ती केली आहे. अत्यंत शांतपणे नियोजन करुन काम करण्याची कला त्यांना अवगत आहे, अशा शब्दात डॉ. आव्हाड यांनी आनंद परांजपे यांचे कौतूक केले.

जितेंद्र आव्हाडांना शिवसेनेचे प्रत्युत्तर

काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद आणि धुसफूस चव्हाट्यावर येताना पाहायला मिळत आहे. अलीकडेच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीला सर्व मार्ग खुले असून, भाजप फारसा दूर नाही, असे वक्तव्य केले होते. जितेंद्र आव्हाडांच्या या विधानावर प्रतिक्रिया यायला लागल्या असून, आघाडीत यायला पाहिजे, असे काही नाही. कुणावर कसलेही बंधन नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.

शिवसेना खासदार विनायक राऊत यांना जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानासंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावेली बोलताना विनायक राऊत म्हणाले की, आघाडी केली म्हणजे सर्वांनी शंभर टक्के आघाडीत आलेच पाहिजे, असे काही नाही. कुणालाही कसलेही बंधन नाही, असा पलटवार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड हे अभ्यासू आणि सुज्ञ नेते आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वच निवडणूका लढवल्या पाहिजेत, या विचाराचे ते आहेत. मात्र, कुठे काही वैचारिक मतभेद किंवा गॅपिंग असेल तर ती नक्कीच दूर केली जाईल. परंतु कोणत्याही परिस्थितीत मोठ्या निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जाव्यात असे सर्वांचे मत आहे, असे विनायक राऊत यांनी सांगितले.

महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष हे स्वतंत्र आहेत. त्यांना कोणी बंधन केलेले नाही. मात्र, प्रत्येक जण परिस्थितीनुसार युती-महायूती करतील आणि भविष्यातील निवडणुका लढवतील. कोणावर बंधने नाहीत. सत्ता स्थापन झाली म्हणजे शंभर टक्के महाविकास आघाडीत आलेच पाहिजे असे बंधन नाही, परंतु एक संकेत आहेत. सर्वांना वाटते महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूका झाल्या तर चांगले होईल, असे सांगतानाच भाजप आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील अंतर मी पाहिलेले नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button