फोकसमनोरंजन

जावेद अख्तर बदनामी प्रकरणी कंगनाला हायकोर्टाचा झटका; याचिका फेटाळली

मुंबई : गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेली बदनामीची कारवाई रद्द करण्याची अभिनेत्री कंगना रनौतची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर जेव्हा अभिनेत्रीने जावेद अख्तर यांच्याविरोधात टीव्ही मुलाखतींमध्ये निवेदने दिली तेव्हा ही बाब सुरू झाली. यानंतर जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला. जावेद यांनी कंगनावर त्यांच्याविरुद्ध खोटी विधाने करून आपली प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला होता. कंगनाने आपल्या याचिकेमध्ये कलम ४८२ सीआरपी सारख्या याचिकेमध्ये जावेदच्या तक्रारीनंतर पोलिसांना चौकशीचे आदेश देण्याचा दंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती.

जावेद यांनी कंगनाविरोधात नोव्हेंबर २०२० मध्ये महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यानंतर डिसेंबरमध्ये कोर्टाने जुहू पोलिसांना कंगनाच्या विरोधात तपास करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून कंगना आणि जावेद यांच्यात वाद सुरू आहे. कंगनाला हे प्रकरण लवकरात लवकर संपुष्टात आणावे असे वाटत असले तरी जावेद तसे करण्याच्या मनस्थितीत नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button