राजकारण

‘मोदीजी आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली?’, काँग्रेसचे मुंबईत उद्या आंदोलन

मुंबई : ‘मोदीजी आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली?’ या कॅम्पेनवरुन देशाच्या राजकारणात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी जोरदार लढाई सुरु आहे. अशावेळी आता मुंबई काँग्रेसनं भाजपविरोधात मंगळवारी आंदोलनाचा इशारा दिलाय. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी या आंदोलनाची घोषणा केलीय. त्यावेळी आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली? याचा जाब भाजपला विचारणार असल्याचं भाई जगताप यांनी म्हटलंय. भाजपला सत्याचा सामना करावाच लागेल. उत्तर मुंबईतून या आंदोलनाची सुरुवात होईल, असं जगताप यांनी आज जाहीर केलंय.

‘कोरोना लसीकरणाबाबत देशात दयनीय स्थिती आहे. १८ ते ४४ वयोगातील लोकांचं लसीकरण करायला हवं ते झालं नाही. पंतप्रधान म्हणतात की राज्याची जबाबदारी आहे. लसीचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार रेशनिंग करत आहे. जगभरातील राष्ट्रप्रमुखांनी देशात लसीकरण करुन घेतलं. मात्र, भारतात पंतप्रधान कोरोना नष्ट झाला असं सांगत ९३ देशांना लस विकतात. भाजप नेते याचं समर्थन करतात. देशाशी कोणतीही ट्रिटी नाही. मी देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करतो’, अशा शब्दात भाई जगताप यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय.

काँग्रेसकडून मुंबईत उद्या आंदोलन केलं जाणार आहे. उत्तर मुंबईतून या आंदोलनाला सुरुवात होईल. मुंबईतील ३६ विधानसभा क्षेत्रात लसीकरण केंद्राबाहेर १०० कार्यकर्ते आंदोलन करतील. त्यावेळी मास्क घालून मानवी साखळी तयार केली जाईल. पुढील ६ दिवस विरोध सुरु राहणार असल्याचं जगताप यांनी जाहीर केलंय. मोदीजी, आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली? असा प्रश्न या आंदोलनातून विचारला जाणार आहे. भाजपला सत्याचा सामना करावाच लागेल, असं आव्हान भाई जगताप यांनी भाजप नेत्यांना दिलंय.

त्याचबरोबर काळ्या बुरशी अर्थात ब्लॅक फंगसवरील उपचारांसाठी लागणारे इंजेक्शन महाग आहे. एका इंजेक्शनसाठी १ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपये लागतात. सर्वसामान्यांना हे परवडणारं नाही. केंद्रानं राज्य सरकारला हे इंजेक्शन खरेदी करण्यासाठी मनाई केली आहे. केंद्राने परवानगीची अट टाकली आहे. मुंबईला रोज २ हजार इंजेक्शनची गरज आहे. एका पॅकेटमध्ये ७ गोळ्या असलेलं पॅकेट तब्बल २० हजार रुपयांना आहे. हे सर्वसामान्यांना परवडणारं नाही. अशावेळी केंद्र सरकारकडून राज्याची कोंडी केली जात आहे. राज्याला सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप जगताप यांनी केलाय.

फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडले

‘देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे ज्यांनी कापली ते कोकणात जावून झाडांची चिंता व्यक्त करतायत. जरा तपासून घ्या स्वत:ला, अशा शब्दांत भाई जगताप यांनी टीकास्त्र सोडले आहे. केंद्र सरकार काही राजा नाही. त्यांनी सर्वांना मदत करायला हवी. आपली नैतिकता त्यांनी गुजरातला बांधलीय. गुजरातला मदत केली मग इतर राज्यांना का नाही ? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २ हजार कोटींचे पॅकेज द्यावे. परंतु, त्यांचा महाराष्ट्रद्वेष पाहता ते काही देतील अशी अपेक्षा नाही, परंतु महाराष्ट्र सरकारने चांगली मदत करावी, असंही भाई जगताप म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button