
मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातून एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना हटवण्यात आले आहे. मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास आता वरिष्ठ पोलिस अधिकारी संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे. या एकूण घडामोडींनंतर समीर वानखेडे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. यानंतर आता एनसीबीने मोठा निर्णय घेत, वानखेडे यांच्याकडून आर्यन खान ड्रग्स प्रकरणा शिवाय आणखी ५ केसेसचा तपास काढून घेतला आहे. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातून समीर वानखेडेची हकालपट्टी केल्यानंतर दिल्ली एनसीबीचे एक पथक उद्या म्हणजेच शनिवारी मुंबईत येत आहे. हे पथक मुंबई झोनमधील आर्यन खान प्रकरणासह इतर ५ अशा ६ प्रकरणांची चौकशी करेल.
दरम्यान, मला तपासातून वगळण्यात आलेले नाही. या प्रकरणाचा तपास कोणत्या तरी केंद्रीय एजन्सीमार्फत व्हावा, अशी माझी न्यायालयात याचिका देखील केली होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीची एसआयटी करत आहे. दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी संघांमध्ये हा एक समन्वय आहे. माझी बदली झालेली नाही. मी अद्याप झोनल डायरेक्टर पदावर कायम आहे. बदलीच्या फक्त अफवा आहेत. फक्त माझ्याकडील ६ केसेस दिल्लीतील टीमकडे देण्यात आल्या आहेत, असे समीर वानखेडे यांनी स्पष्ट केले आहे.
एनसीबीच्या मुख्यालयाच्या महासंचालकांनी विशेष तपास पथकाची स्थापन करण्यात आलेली आहे. या प्रकरणातील कमतरता आणि पुढचा सखोल तपास करण्यासाठी एनसीबी मुंबई झोनल युनिटकडून एकूण ६ प्रकरणे ताब्यात घेणार आहे. याचा संबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिणामांची आहे. कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या भूमिकेतून काढून टाकण्यात आलेले नाही आणि विरुद्ध कोणतेही विशिष्ट आदेश जारी होईपर्यंत ते आवश्यकतेनुसार ऑपरेशन्स शाखेच्या तपासाला मदत करत राहतील. एनसीबी संपूर्ण भारतात एकल एकात्मिक एजन्सी म्हणून कार्य करते, हे पुन्हा एकदा आम्ही नमूद करू इच्छितो, असे या प्रकरणाचे नवे तपास अधिकारी संजय सिंह यांनी म्हटले आहे.
वानखेडे यांच्या बदलीबाबतच्या वृत्तानंतर नवाब मलिकांनी ट्विट केले की, समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणासह ५ खटले मागे घेण्यात आले आहेत. अशी २६ प्रकरणे आहेत, ज्यांची चौकशी आवश्यक आहे. ही तर फक्त सुरूवात आहे. ही यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल आणि आम्ही ते करू.
आर्यन खान प्रकरणापासून हटविल्याच्या बातम्या आल्यानंतर, एएनआयसोबत बोलताना समीर वानखेडे म्हणाले, मला तपासापासून हटविले गेले नाही. या प्रकरणाची चौकशी केंद्रीय एजंसीकडून करण्यात यावी, यासाठी मी कोर्टात रिट पिटिशन दिले होते. यामुळे आर्यन केस आणि समीर खान (नवाब मलिक यांचा जावई) प्रकरणाचा तपास आता दिल्ली एनसीबीची एसआयटी करेल. हा दिल्ली आणि मुंबई एनसीबीच्या टीममध्ये समन्वय आहे.