Top Newsराजकारण

गुलाबराव पाटलांच्या मुलाच्या लग्नात रंगली राजकीय टोलेबाजी

गिरीश महाजन यांच्या टोल्याला जयंत पाटील, नवाब मलिकांचे प्रतिटोले

जळगाव : जळगावात गुलाबराव पाटलांच्या मुलाच्या लग्नात सर्व नेते मंडळी एकत्र आले होते, परंतु लग्न सोहळ्यातही एकमेकांना राजकीय टोलेबाजी करताना दिसून आले. सत्ताधाऱ्यांना आधी गिरीश महाजन यांनी टोला लावला, त्यानंतर महाजन यांना राष्ट्रवादी नेते जयंत पाटील आणि नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यावरून गिरीश महाजन यांनी आमचा २५ वर्षांचा संसार होता तो तुम्ही मोडला, असा टोला सत्ताधाऱ्यांना लगावला. विरोधी पक्षाकडून भाऊ शुभेच्छा तुम्हाला घ्याव्या लागतील, असंही महाजन म्हणाले. यावेळीही भाजपची सत्तेतून बाहेर राहिल्याची खदखद दिसून आली. त्याला जयंत पाटील आणि नवाब मलिक यांनीही तसंच मिश्कील उत्तर दिलंय.

महाजनांना उत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, त्यांची ती खंत आहे, दुःख आहे. आम्ही फारस लक्ष देत नाही. त्यांचा संसार का मोडला आहे. याच उत्तर उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी दिल आहे. असंही जयंत पाटील म्हणालेत. गिरीश महाजन यांना राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलंय. महाजन यांनी आज संसार जुळत असताना, आज शुभ दिनी त्यांनी शुभ बोलायला पाहिजे, ते अपशब्द बोलतात. असा टोला नवाब मलिक यांनी लगावलाय. सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली त्यावेळीही भाजपकडून या सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आणि त्याला तशीच प्रत्युत्तरे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून देण्यात आली. गुलाबराव पाटलांच्या मुलाचे लग्न जरी कौटुंबीक कार्यक्रम असला तरी तिथे सर्व पक्षाचे नेते एकत्र आल्यानंतर एकमेकांना टोलेबाजी करायला मात्र विसरले नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button