
मुंबई: राज्यातील स्तरनिहाय अनलॉक बाबतचा आदेश अखेर जारी करण्यात आला आहे. करोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत. यात पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या आणि २५ टक्केपेक्षा कमी ऑक्सिजन बेड व्यापले आहेत असे जिल्हे निर्बंधमुक्त राहणार आहेत. तर ५ टक्के पॉझिटिव्हिटी दर व २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, दर गुरुवारी निश्चित निकषानुसार स्थिती आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात येणार असून त्याआधारावर कुठे निर्बंध कमी करायचे आणि कुठे वाढवायचे याबाबतचा नवा आदेश लागू केला जाणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी पुढील आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच सोमवारपासून होईल, असे नमूद करण्यात आले आहे. ही अधिसूचना सोमवारपासून लागू होईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे त्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रशासकीय पातळीवरील या निर्बंधांची अंमलबजावणी केली जाईल.
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जी माहिती दिली होती ती खरी निघाली आहे. जो आदेश जारी करण्यात आला आहे त्यात तसेच निकष निश्चित करण्यात आलेले आहेत. ४ जून या तारखेचा हा आदेश मध्यरात्रीच्या सुमारास हाती आला आहे. या आदेशानुसार निर्बंधांबाबत पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. यात पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दर आठवड्याला करोना स्थितीनुसार हे जिल्हे बदलणार आहेत.
अनलॉक करत असताना पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. पहिल्या स्तरात १० जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या स्तरात २ जिल्ह्यांचा समावेश आहे. तिसऱ्या स्तरात १५ जिल्ह्यांचा समावेश आहे तर चौथ्या स्तरामध्ये ८ जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या पाचव्या स्तरात एकही जिल्हा नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली तर पाचव्या स्तरात त्या जिल्ह्याचा समावेश केला जाईल. २० टक्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट असेल आणि ७५ टक्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील, तो पाचवा स्तर असेल.
असे आहेत पाच स्तर:
पहिला गट : पहिल्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्क्यांहून कमी ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे.
दुसरा गट : दुसऱ्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ ते ४० टक्क्यांदरम्यान ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात आहे.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1400911528010805252
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1400911537942908931
तिसरा गट : तिसऱ्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये ५ ते १० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ४० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
चौथा गट : चौथ्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये १० ते २० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ६० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
पाचवा गट : पाचव्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आणि ७५ टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. पाचव्या गटात कायम रेड झोन असणार आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 4, 2021
कुठे काय सुरू होणार?
स्तरनिहाय अनलॉकची प्रक्रिया कशी असणार? काय, काय सुरु राहणार?
स्तर – १
– सर्व प्रकारची दुकानं पूर्ववत सुरु होणार, मॉल, दुकानं, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह नियमितपणे सुरु होणार
– लोकल सेवा पूर्ववत होईल, मात्र स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला निर्बंध घालण्याची मुभा असेल
– जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी, सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली होतील
– सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत होईल, इथे जमावबंदी नसेल
– खासगी कार्यालये सुरु होती, तर शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरु होतील
– विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल
– लग्नसोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतीही बंधनं नसतील, या भागात जमावबंदी नसेल.
स्तर – २
– ५० टक्के क्षमतेने रेस्टॉरंट सुरु राहतील
– मॉल्स आणि सिनेमगृह ५० टक्के सुरु राहतील
– सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरु राहतील
– बांधकाम क्षेत्रातील पूर्ण कामे सुरु राहतील
– कृषी क्षेत्रातील कामे पूर्ण सुरु राहतील
– ई सेवा पूर्ण सुरु राहिल
– जिम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील
– बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने सुरू राहतील
– जिल्हयाच्या बाहेर खाजगी वाहन , बसेस, इतर राज्यात जाणारी लोकल सेवा, टॅक्सी यांना परवानगी आहे. मात्र पाचव्या स्तरातील जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची आवश्यकता असेल.
स्तर – ३
– अत्यावश्यक सेवेतील दुकाने ७ ते २ वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार ७ ते २ वाजेपर्यंत सुरू राहतील अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद राहतील
– मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील
– हॉटेल्स ५० टक्के क्षमतेने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत खुली रहातील. दुपारी २ नंतर पार्सल सेवा सुरू राहिल. शनिवार आणि रविवार बंद राहतील.
– सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी ५ ते ९ यावेळेत सुरू रहातील
– खाजगी आणि सरकारी कार्यालयात ५० टक्के क्षमतेने उपस्थिती राहील
– इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील
– सिनेमा चित्रीकरणाला स्टुडीओ मध्ये परवानगी असेल
– सामाजित, सांस्कृती, मनोरंजनात्म कार्यक्रमाला ५० टक्के क्षमतेने दुपारी २ वाजेपर्यंत परवानगी राहील (सोमवार ते शुक्रवार)
-लग्न सोहळे ५० जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार २० जणांची उपस्थिती, इतर बैठका ५० टक्के उपस्थित राहील
– कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी २ वाजेपर्यंत परवानगी राहील
– दुपारी २ वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहील
स्तर – ४
– अत्यावश्यक सेवेतील दुकाने ७ ते २ वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) उघडी राहतील
– अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं पुर्ण वेळ बंद रहातील
– सिनेमागृह, मॉल पूर्णपणे बंद राहतील
– हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू राहील
– सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी ५ ते ९ सुरू रहातील (सोमवार ते शुक्रवार)
– अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालयात फक्त २५ टक्के उपस्थिती राहील
– शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थिती
– स्पोर्टसमध्ये आईटडोर सकाळी ५ ते ९ (सोमवार ते शुक्रवार) सुरु राहतील
– कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमालाल परवानगी नाही
– लग्न सोहळ्यासाठी २५ लोकांची उपस्थिती, अंत्यसंस्कारसाठी फक्त २० लोकांची उपस्थिती बंधनकारक
– राजकीय किंवा इतर बैठका ५० टक्के क्षमता राहील
– ज्या ठिकाणी कामगारांच्या रहाण्याची सोय आहे अशाच ठिकाणाची बांधकामं सुरू रहातील
– कृषी कामे दुपारी २ वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहतील.
– ई कॉर्मस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील
-सलून आणि जीम ५० टक्के क्षमता सुरू राहील पण एसीचा वापर करता येणार नाही
– बसेस ५० टक्के क्षमतेने सुरु राहील. उभे प्रवासी नाही
– संचारबंदीचे नियम लागू राहतील
स्तर – ५
सध्या पाचव्या टप्प्यात एकही जिल्हा नाही. जर पुढील आठवड्यात जास्त रुग्णसंख्य वाढली तर पाचव्या टप्प्यामध्ये समावेश होईल