आयपीएल फ्रँचायझीच्या वादानंतर सौरव गांगुलीचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली याच्यावर हितसंबंध जपण्याचा आरोप केला गेला. इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल २०२२) पुढील पर्वासाठी दोन नव्या संघांची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यात आरपी संजीव गोएंका यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ, तर सीव्हीसी कॅपिटल यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली. संजीव गोएंका यांनी लखनौ फ्रँचायझी जिंकल्यानंतर सौरव गांगुली अडचणीत येण्याची चिन्ह निर्माण झाली होती आणि त्यामुळे त्यानं हे पाऊल उचलले.
सौरव गांगुलीनं इंडियन सुपर लीगमधील मोहन बगान क्लबच्या संचालक सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. आरपीएसजी यांच्याकडे मोहन बगान संघाचे मालकी हक्क आहेत. यामध्ये भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, व्यावसायिक हर्षवर्धन नियोतिया, संजीव गोयंका आणि उत्सव पारेख यांचा समावेश आहे. त्यामुळे गांगुलीवर हितसंबंध जपण्याचा आरोप होत होता. मी राजीनमा दिलाय, असे गांगुलीनं सांगितले.
सौरव गांगुली यांच्यासोबतच्या हितसंबंधांच्या संघर्षाबाबत गोयंका यांनी सांगितले की, मला वाटते सौरव गांगुली मोहन बागानमधून पूर्णपणे बाजूला होणार आहेत. याबाबत अधिक विचारणा केली असता हे सर्व आजच होईल, असे त्यांनी सांगितले.




