
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या कहरमुळे बर्याच लोकांचा जीव गेला आहे. कोविड -१९ विरुद्ध लढ्यात कोरोना योद्ध्याप्रमाणे लढा देत असणार्या अनेक डॉक्टरांनाही कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेत तब्बल ६०० हून अधिक डॉक्टरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या सुरू असलेल्या दुसर्या लाटेत कोविड -१९ मुळे एकूण ६४६ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत सर्वाधिक १०९ मृत्यू झाले असून यानंतर बिहारनंमध्ये ९७, उत्तर प्रदेशमध्ये ७९, राजस्थानमध्ये ४३, झारखंडमध्ये ३९, गुजरातमध्ये ३७, आंध्र प्रदेशात ३५, तेलंगणात ३४ आणि पश्चिम बंगालमध्ये ३० डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोविड -१९ रजिस्ट्रीमध्ये आयएमएचा डेटा ५ जूनपर्यंत जाहीर करण्यात आला आहे.
कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेमध्ये ७४८ डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात महामारीच्या दुसऱ्या लाटेत २३ डॉक्टरांचा कोरोनाच्या संसर्गाचा बळी गेला. कोविड -१९ च्या दुसर्या लाटेत एकूण ६४६ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक १०९ मृत्यू दिल्लीत तर बिहारमध्ये ९७ डॉक्टरांचा मृत्यू झाला, असे इंडियन मेडिकल असोसिएशनने सांगितले.
भारतात कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने देशाची चिंता वाढली होती. परंतू दररोजच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसत असले तरी मृत्यूची संख्या जास्त आहे. भारतात कोरोनाचे १,२०,५२९ नवीन रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासात ३ हजार ३८० जणांचा कोरोनाने बळी गेला असून कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून ३ लाख ४४ हजारांवर पोहोचली आहे. तर सक्रिय रूग्णांची संख्या कमी झाली असून सध्या १५ लाख ५५ हजार २४८ इतकी झाली आहे. यासह देशात कोरोनाच्या रिकव्हरी दरात सुधारणा झाली आहे. त्यामुळे हा दर आता ९३. ०८ टक्के इतका झाला आहे.
लसीकरणात भारत, अमेरिका आणि चीन आघाडीवर
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जगभरात तितक्याच मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण मोहिम राबविली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कोरोना महामारीदरम्यान, आतापर्यंत दोनशे कोटी लसीचे डोस वाटप केले गेले आहेत. भारत, चीन आणि अमेरिका या देशात सर्वाधिक ६० टक्के लस नागरिकांना दिली गेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस टेड्रोस अॅडनॉम घेब्रेयसिसचे वरिष्ठ सल्लागार ब्रूस एल्वार्ड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, लसीकरणाची ही संख्या अपेक्षेप्रमाणे आहे. संस्थेने कोव्हॅक्स मोहिमेअंतर्गत १२७ देशांना ८ करोड लसीचे डोस दिले आहेत. भारत, अमेरिका आणि चीनला २०० करोडपैकी प्राप्त झालेल्या लसींपैकी ६० टक्के लस त्यांच्याच देशात तयार आणि वितरित करण्यात आले आहेत.
भारताने संयुक्त राष्ट्रांच्या शांतीदूतांना २ लाख कोरोना लसी पहिल्या खेपेत पाठविल्या आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस यांचे प्रवक्ते अँटोनियो गुटेरेस यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत जगातील गरीब देशांमध्ये फक्त ०.५ टक्के लस पोहोचली आहे. जी जगातील लोकसंख्येच्या दहा टक्के आहे. तसेच भारतातील सीरम संस्था जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. भारतात आल्यामुळे दुसर्या लाटेमुळे सीरम संस्थेतून तयार होणार्या लस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे ब्रूस एल्वार्ड यांनी सांगितले.
अमेरिकन खासदारांनी अध्यक्ष जो बिडेन यांच्या लसी वितरण धोरणाचे कौतुक केले आहे. अमेरिका ८ करोड डोस लस देणार आहे. त्यापैकी अडीच करोड लसींची पहिली तुकडी आता दिली जात आहे. भारत हा देश लस प्राप्त करणार्या प्रमुख देशांपैकी एक आहे. जून अखेरीस आठ करोड लस डोस देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतरच भारताने दोन लाख लस डोस संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांना विनामूल्य पाठवले होते. त्यानंतर आता संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटेरेसचे प्रवक्त्याने सांगितले की, सर्व शांती सैनिकांना भारतातून पाठवलेली लस देण्यात आली आहे.