दहावी-बारावीच्या ऑफलाईन परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध
![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/04/students.jpg)
मुंबई : राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा २३ एप्रिलपासून ऑफलाईन पद्धतीने सुरु होत आहे. मात्र, याला दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. राज्य सरकारच्या बोर्ड परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या विरोधात शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला आहे. वर्षभर शिक्षण ऑनलाईन मग परीक्षा ऑफलाईन का? असा सवाल करत या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्यायला विरोध केलाय. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच घ्याव्यात या मागणीसाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील विद्यार्थांनी एकत्र येऊन आंदोलन केलंय. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवसेना भवनपासून जाण्यास सांगितले आहे. सध्या हे विद्यार्थी शिवाजी पार्कवर आंदोलन करत आहेत. दरम्यान, आंदोलक विद्यार्थ्यांची संख्या पाहता शिवाजी पार्क परिसरात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.